Close

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात ? बिग बॉस ओटीटी स्पर्धकाचा दावा ( Tejasswi Prakash and Karan Kundrra May Get Married by Next Year)

टीव्हीची सुंदर नागिन तेजस्वी प्रकाश तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. 'बिग बॉस 15' दरम्यान, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यातील जवळीक वाढू लागली आणि येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. शो संपल्यानंतर दोघेही अनेकदा एकमेकांसोबत दिसले. दोघेही अनेकदा उघडपणे एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात आणि एकमेकांसोबत सुट्टीचा आनंदही घेतात. अशा परिस्थितीत त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण आता बातमी येत आहे की, तेजस्वी आणि करण पुढच्या वर्षी लग्न करू शकतात. 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली मुनिषा खटवानी हिने याचा खुलासा केला आहे.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा जेव्हा कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावतात तेव्हा त्यांच्याकडे एक जोडपे म्हणून पाहिले जाते, परंतु लग्नाच्या प्रश्नावर दोघेही अनेकदा गप्प बसतात आणि कोणतेही उत्तर देत नाहीत, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. दोघांचे लग्न कधी होणार?

आता जरी तेजस्वी आणि करणने त्यांच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल कोणालाही सांगितले नसले तरी नुकतीच 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसलेली मुनिषा खटवानी हिने दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकतील असा अंदाज मुनिषाने वर्तवला आहे.

'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसलेली मुनिषा खटवानी ही व्यवसायाने टॅरो कार्ड रीडर आहे, तिने अलीकडेच भविष्यवाणी केली आहे की तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा पुढच्या वर्षी लग्न करू शकतात. यासोबतच दोघांच्या लग्नाचे प्लॅनिंगही सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. आता हे भाकीत कितपत खरे ठरते हे येणारा काळच सांगेल.

मात्र, सध्या तेजस्वी प्रकाशने लग्नाबाबत काहीही सांगितले नाही किंवा करण कुंद्राकडूनही कोणतेही वक्तव्य आलेले नाही. काही दिवसांपूर्वी तेजस्वी आणि करणच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी खूप चर्चेला उधाण आले होते, पण लवकरच या जोडप्याने त्यांच्या व्हेकेशनचे फोटो शेअर करून ब्रेकअपच्या अफवांना पूर्णविराम दिला.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचे प्रेम 'बिग बॉस 15' मध्ये फुलले होते, पण नंतर लोकांना वाटले की दोघेही शो जिंकण्यासाठी प्रेमात असल्याचे नाटक करत आहेत. मात्र, शो संपल्यानंतरही दोघांमधील प्रेम कायम राहिल्याने लोकांचा हा संभ्रम दूर झाला. इतकेच नाही तर काळाच्या ओघात दोघांमधील प्रेम वाढत आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/